Saturday, June 26, 2021

राजर्षीं

 *अंगिकारून राजर्षींच्या नीती,

सर्वांगीण विकासाचे होऊ सारथी !* 


स्पष्टीकरण - 

प्लेटो ह्या ग्रीक विचारतज्ञाने इसवीसन पूर्व ५ व्या शतकात फिलॉसॉफेर किंग ही संकल्पना मांडली.ही व्यक्तिरेखा म्हणजे ज्ञानाचा चाहता,सत्याचा कैवार करणारा,प्रजेचे हित पाहणारा राजा होय.हे सर्व गुण शाहू महाराजांमध्ये दिसून येतात.

चाणक्य नीती मधील तत्वज्ञानी राजा आणि 

समर्थ रामदास श्रीमानयोगी 

ही बिरुद शिवाजी महाराज आणि नंतर शाहू महाराज यांच्या स्वभावगुणांशी मिळत्याजुळती आहे.ज्यात नीतिशास्त्र हे विकासाचे साधन आणि राजनीती हा पाया मानून राजांनी कार्य केले.त्याच बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकास करणयासाठी राज्यांचा आदर्श घेईन सारथी ही संस्था काम करणार आहे.त्यांचे क्रांतिकारी आणि समानतावादी विचारांना अमलात आणून उक्ती आणि कृतीत काही फरक नसल्याचे द्योतक प्रशासन असायला हवे.

अंत्योदय वर भर देऊन दुर्बलांच्या सर्वांगीण सबलीकरणासाठी संस्थेद्वारे राबवलेले लोकशाही जनप्रतिनिधी आणि सहकार चळवळ उभी करून आपल्या द्रष्टेपणाचे दाखले त्यांनी दिले.सर्वांगीण विकास हा केवळ शैक्षणिक व राजकीय न ठेवता तो खेळांपर्यंत आणि उद्योगांपर्यंत नेण्याचे काम राजांनी केले. उदा.मल्लविद्या,चित्रकला,नाट्य फोटोग्राफी यांना प्रोत्साहन देण्यात आले.

 त्यामूळे सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात भरीव कामगिरी करून बहुजन समाजाला न्याय देणे हे सरकारचे आद्य कर्तव्य आहे. तरच समान आणि समावेशक विकासाची ही दूर होईल.कारण समस्या कितीही मोठी असली तरी सारथ्य कुशल असल्यास कोणत्याही संकटावर मात शक्य आहे.आणि हाच तो ज्ञान मार्ग ज्यात अर्जुनाचे सारथ्य करताना कृष्ण म्हणतो

न धरी शस्त्र करी मी गोष्टी संगें युक्तीच्या चार !!!


- भारत (हिमांशू टेंभेकर) 

Saturday, June 19, 2021

बापपण


मुलांच्या भविष्यासाठी स्वतःच मी पण गमवाव लागत ,

फक्त जन्म दिल्याने बापपण येत नाही, ते कमवाव लागत ! 


कष्टाने खेचवा लागतो संसाराचा गाडा ,

मुकाट्यानेच प्यावा लागतो दुखाचा काढा ,

मनातल्या अस्थिरतेच वादळ आतल्या-आतच शमवाव लागत ,

फक्त जन्म दिल्याने बापपण येत नाही,ते कमवाव लागत ! 


खंबीरपणे उभे राहून कुटुंबाचा आधार व्हावा लागतो,

सगळ्यांप्रति कर्तव्याचा भार वहावा लागतो

भागत नसेल तरीही थोड्यातच जमवाव लागत !

फक्त जन्म दिल्याने बापपण येत नाही ते कमवाव लागत ! 

 

भारत (हिमांशू)

Tuesday, June 1, 2021

माझी वाट

ते माझे झाले होते,भेटताच क्षणी पण

मी तसा त्यांचा कधीही झालोच नाही 


ते अव्यक्त असून मजला,जरी सर्व कळाले होते

व्यक्त होऊन का त्यांना मी कळलोच नाही ? 


काटेरी वाटेवरती एकलाच चालत गेलो

तरी थकूनी असा माघारी मी वळलोच नाही


ओथंबूनी आलो मनाने ,जरी मी प्रत्येक ऋतूला

मनसोक्त तुझ्यापुढे मी कधी कोसळलोच नाही


ठेचाळल्या पायांना, उसंत मिळाली थोडीच

ध्येयाच्या मार्गावर मी अडखळलोच नाही 


बंड करून मनाने,कित्येक उठवल्या ज्वाळा

त्या स्थंडीलातही मी पुरता जळलोच नाही 


सारे प्रकाशित करण्या उगवला मित्र तो जेव्हा 

मी विझलो होतो तेव्हा,मग उजळलोच नाही