Sunday, October 5, 2025

The Great Birding Blunder at Erangal Beach

 One fine morning of Saturday,my inner bird explorer decided to make its grand return equipped with my brother-in-law’s I ❤️ Goa T-shirt, scandal-sized sandals,and a heroic spirit that barely survived Mumbai’s local trains.

From Cotton Green to Malad I journeyed through humanity in its densest form shoulder-to-shoulder, sweat-to-sweat, dream-to-dream.

I walked to the bus stop through the fish market full of fresh fish flavours.I hopped onto BEST Bus No.271 a vehicle clearly designed to test the limits of human spine endurance through its legacy of at least 100 years from condition.The road was less of a surface and more of a topographical challenge.After enough bumps to qualify for a roller-coaster license.





I reached Erangal stop then walked for 300 m to reach the famous 1575 AD. church built after the arrival of Vasco Da Gama.Then seek blessing of Omkareshwar.

 

to go on bare rocks in the right side where my prize awaited "the Common Ringed Plover"prancing gracefully like it owned the place.Along with some of my close fellow birders - Ritesh Bagul,Alok Bhave,Avinash Bhagat,Shahid Shaikh and Neha mam.(कल के बिछड़े हुए हम आज मिले).



Just as I raised my camera to capture the glorious bird BAM !my battery died.(Ye kya hua kaise hua kyu hua)A tragic betrayal.But my hero of the day, Shahid,appeared with a fully charged Nikon battery (tu to dev manus nikla re). Thanks to him,I managed to click some stunning shots the plover framed beautifully against splashing waves that looked straight out of a travel magazine(if you ignore the plastic bottles floating nearby).

The Common Ringed Plover (Charadrius hiaticula) is a small migratory shorebird that visits India mainly during the winter months. It breeds in northern Europe and migrates southwards to warmer coasts like Africa but in between they halt as passage migrants in coasts including parts of India such as Gujarat, Maharashtra, Andhra Pradesh, and coastal Tamil Nadu. This bird is often seen on mudflats, sandy beaches, saltpans, and tidal shores, feeding on small insects and crustaceans. It has a distinct black breast band, brown upperparts, white underparts, and an orange bill with a black tip. Compared to the Little Ringed Plover, it lacks the yellow eye-ring and appears slightly larger. In India, it is considered an uncommon winter visitor, sometimes overlooked among mixed shorebird flocks.



We rewarded ourselves with Solkadhi from home tangy, refreshing, and slightly sandy.Feeling ambitious,we set out to another beach in search of the Oystercatcher because someone tortured it for photography and it decided to stay away from the spot for the day,but the only thing catching anything was our half-functional AC while returning back in car.

Parched and exhausted,we ended our expedition with tender coconut water, the elixir of tired and dehydrated birders.Sweet, cool,and perfectly timed.

Finally,I took a train back from Goregaon to cotton green where a Ticket Checker suddenly appeared like a jump-scare.My mini heart attack ended only after I found the ticket hiding safely in my bag.Sweet relief freedom,once again!


Moral of the story is Birds are rare, buses are bumpy, and adventures are guaranteed especially when you wear borrowed clothes and travel with a camera that loves drama. 🕊️🌴😂.

Sunday, January 21, 2024

राम आहे

अंधार चौहु कडे 

प्रकाश राम आहे 

कर्तुत्व झेप घेण्या 

आकाश राम आहे 


मनी बांधलेला 

ध्यास राम आहे

गर्व जाळण्याचा 

अभ्यास राम आहे 


ध्येयाचा साधलेला 

नेम राम आहे 

निस्वार्थी,निष्कलंक 

प्रेम राम आहे 


अनितीच्या मुळावरचा 

घाव राम आहे 

भवसागर पार करण्या

नाव राम आहे 


खडकास भेदणारे

मूळ राम आहे 

सत्याचे लागलेले 

खूळ राम आहे 


मनातल्या भयाला

अभय राम आहे 

विस्तारल्या जगाचा 

विलय राम आहे 


उन्हात डोलणाऱ्या 

कणसात राम आहे 

इतरत्र शोध व्यर्थ 

माणसात राम आहे 


भारत...(हिमांशु)

Thursday, April 13, 2023

आंबेडकर म्हणजे ?

 आंबेडकर म्हणजे 

परीपूर्ण विद्याव्यासंग आहे 

आंबेडकर म्हणजे

घटनेचा मूलभुत अंग आहे 


आंबेडकर म्हणजे

स्थितप्रज्ञेतेची किनार आहे

आंबेडकर म्हणजे 

विरोधी बंडाची पुकार आहे 


आंबेडकर म्हणजे 

अचूक अस विश्लेषण आहे 

आंबेडकर म्हणजे

जाज्वल्य असे लेखन आहे 


आंबेडकर म्हणजे

ज्ञानाचा विश्वविजय आहे

आंबेडकर म्हणजे

समता संघर्षाचा उदय आहे


आंबेडकर म्हणजे

हक्काच्या न्यायाची हमी आहे 

आंबेडकर म्हणजेच 

मानवता जपणारा तू अन् मी आहे


भारत (हिमांशू)

Saturday, April 8, 2023

लिहीन म्हणतो


अनेक झाल्या करुनी तशा प्रेमावर कविता 

आता नव्या क्रांतीचे, विचार लिहीन म्हणतो


गंजत चाललं आहे आता समाजमन पुन्हा

त्यांना मी विवेकाची, पुकार लिहीन म्हणतो


उघड्या व्यवस्थेची लक्तरे रोज टांगणीला 

समाजमान्य तो,अत्याचार लिहीन म्हणतो 


श्रीमंतास देवळात भेटे भगवंतही त्वरेने

दारिद्र्याशी केलेला, करार लिहीन म्हणतो


सगळे गुंगलेले दिखाऊ दूनियेमध्ये पण

भूवरील प्रत्यक्ष, समाचार लिहीन म्हणतो 


समतेच्या मारुनी गप्पा दुर्लक्षिले शोषिताना

सत्तेपुढे शहाणपण, लाचार लिहीन म्हणतो 


भेद मांडले सारे लिंग,जाती,धर्म नी पंथाचे

पण मी माणुसकीचा,दरबार लिहीन म्हणतो 

  

जोडून हाथ झाले आपल्याच हक्कांसाठी 

त्याच हातांमध्ये मी,तलवार लिहीन म्हणतो


असत्याच्या पुष्पमाला तुम्हास लख लाभो 

अंगी संघर्ष खुणांचा,शृंगार लिहीन म्हणतो  


विविध रंगी झेंड्यांचे संघर्ष होतात येथे  

एकच रक्ताची लाल,धार लिहीन म्हणतो 


नैतिकता लयास गेली,गेली वाहून तत्वे 

सभ्यतेला पडलेले, खिंडार लिहीन म्हणतो


रंजल्या नी गांजल्यांच्या वेदना कळती कुणा

त्यांसाठी शब्द करून,धारधार लिहीन म्हणतो 


थंडावल्या अस्मिता येथे,इमान गहाण गेला

मनाच्या यज्ञातला तप्त,अंगार लिहीन म्हणतो 


अन्याया विरुद्ध बोलणे गुन्हा ठरवेल कोणी 

पुन्हा इन्कलाबाचे, मी उद्गार लिहीन म्हणतो


भारत (हिमांशू)

Thursday, March 30, 2023

श्री रामचंद्र

 श्री राम , मर्यादा पुरुषोत्तम राम , सिया वर राम अनेक नाव पण त्याच बरोबर व्यक्तिमत्त्वाच्या अनेक छटा ! 

नुसत प्रेम करायचं नाही तर त्यासाठी धनुष्य सुध्दा मोडण्याची मनगटात ताकद बाळगावी हा संदेश देणारे राम ! आजच्या पिढीला किती लागू होत हे आपल्या ह्या भौतिकता वादाकडे झुकलेल्या जीवनात आपल्या लोकांच्या प्रेमासाठी काय काय करतो आपण हा प्रश्न एकदा स्वतःला विचारायला हवा.प्रेम तर होणे सोपे पण जबाबदारी समजून ते निभावणे तेव्हढेच कठीण सध्या प्लास्टिक प्रेमाची सवय झालीय लोकांना ! आपल्या हिशोबाने ते वळायला हवं पण प्रेम हे दुहेरी असत त्यात काही अंशी स्वतःला मी पण बाजूला ठेऊन. कुणाच्या तरी आत्म्याशी एकरूप व्हावे लागते.सध्याच्या धकाधकीच्या आणि वेगवान जगात आपण आपल्या जवळच्या लोकांशी साधं नीट संवाद साधत नाही एकरूपता तर राहूच द्या.


कुटुंबवत्सल रामाचा सध्या एकही गुण आपण घेऊ शकतो का ?वडीलांच्या एका वचनाखातर आपल्या संपूर्ण ऐश्वर्य आणि अधिकारावर तुळशीपत्र ठेवणारा राम जितका महत्त्वाचा तितकाच मोठ्या भावाच्या पादुका गादीवर ठेऊन राज्य करणारा भरत देखील महान म्हणावा लागेल.आज बांधावरून भाऊकीमध्ये होणारे वाद आणि त्यातून चक्क एकमेकांच्या जीवावर उठलेली ही मंडळी पाहिली की त्यांना लहानपणी हे रामयाणातले धडे मिळाले नाही का असा प्रश्न पडतो.

बर त्यात आज वैयक्तिक स्वातंत्र्याच वलय बरच वाढल आहे त्यामुळे जोडीदाराच्या आई वडिलांची अडचण होणे साहजिक आहे.त्यात आपल्या साथीदाराने घर सोडण्याचा घेतलेला निर्णय अर्धांगिनी म्हणून पूर्ण  करण्याचा सीतेचा हट्ट कौतुकास्पद आहे.नाहीतर राजेशाही थाटात वाढल्यावर दोन कापडा सकट घराबाहेर पडायला काळीज खूप मोठं असावं लागत.

सर्वसमावेशक वृत्ती प्रभू रामचद्रांच्या कडून घेण्यासारखी एक महत्त्वाची गोष्ट आहे.केवटाची नाव असो की वानारांची सेना,शबरीची उष्टी बोर का असेना रामाने त्यांचा आनंदाने स्वीकार केला.आजच्या देशातल्या काही घटना ही सर्वसमावेशकता लोप पावल्याचे द्योतक आहेत.स्मित हास्य आणि निर्मळ मनाने लोकांना आपलंसं करता येत हे आपण शिकायला हवं.

रामाच्या हातातला धनुष्य आणि ते रौद्र रूप हे त्यांचं मूळ स्वरूप नाही.कायम हास्य वदनाने परिस्थितीला सामोरं जाणे,आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर संघर्ष करणे,आपल्याला माया लावणाऱ्याना जीव लावणे ह्यातच खर जीवनाचं प्रेयस आहे.ते मर्कट असो की कोटी खार प्रत्येकाला आपल्याला काय मिळेल ह्या पेक्षा मी काय करू शकतो याचा विचार मनात येतो हे खऱ्या अर्थाने राम राज्याचं लक्षण आहे आणि हेच आपल्याला छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात दिसून येत. मावळमध्ये मोहिमेवर जाण्यासाठी लागणारी स्पर्धा आणि स्वराज्यासाठी असणारी तळमळ ही निःस्वार्थी भावनेतूनच येत.

मग धनुष्य हाती घ्यावा की घेऊ नये असा प्रश्न अनेकांना पडतो तेव्हा प्रत्येक वेळी धनुष्य घेऊन राम कधी उभा राहिला नाही आधी सागराला हाथ जोडून केलेली विनंती ऐकली नाही तेव्हा रामाने धनुष्यावर बाण चढवला हे ध्यानात राहू द्यावे.आपल्यावर अन्याय झाल्यावर आणि अधर्म झाल्यावर आपण संघर्ष सज्ज व्हावे हा तो संदेश पण मग संकट हे खऱ्या अर्थाने आलेलं असावं कोणी भीती निर्माण करून तयार केलेलं आभासी नसावं.अवघे विश्वची माझे घर म्हणणारे आपण कुठलाही मानवनिर्मित चौकटीत अडकून राहू नये हीच रामायणाची खरी शिकवण आहे.

खरे पाहता प्रभू श्रीराम ही मुळी व्यक्ती नाहीच ते स्थिर आणि संपूर्ण मनाचं प्रतीक आहे आणि धनुष्यबाण हा त्या मनाचा संयम ! मारुती राया म्हणजे ह्या मनाचे धैर्य ,लक्ष्मण म्हणजे विश्वास! ह्या गुणांच्या सहाय्यानेच आपल्याला अडचणींचा सागर पार करता येतो आणि सीता रुपी प्रेमाने पूर्णत्व प्राप्त करता येते. खर राम हे व्यक्तिमत्त्व साकार होत आणि म्हणूनच सियावर रामचन्द्र हे नाव सार्थ ठरते.

तेव्हा रामराज्य हे राष्ट्र पटलावर अमलात आणण्या आधी मन पटलावर आणि वैयक्तिक आयुष्यात अमलात आणायला हवे.शेवटी सुज्ञ व्यक्तितून समाज आणि समाजातून राष्ट्रीय चारित्र्य घडत असतो.

भारत (हिमांशू टेंभेकर)

Thursday, September 15, 2022

इंजीनियर दिन

हम इंजीनियर ! 


पुल हो या मशीनें 

हम ही तो जोड़ते है 

बहावों की दिशा 

हम ही तो मोड़ते है


हमारे शानमे खड़ी 

ये ऊंची इमारतें है

हम ही विज्ञानसंग

करते शरारते है 


कंप्यूटर की बुद्धि 

हमसे ही तो है 

समाज की वृद्धि 

हमसे ही तो है 


हम ही दुनिया के 

ऊर्जा प्रदाता है 

अनसुलझी बातों के 

हम ही ज्ञाता है

Saturday, September 10, 2022

मी

निराशेचे मेघ आता 

जरी गडद हो झाले 

त्या अंधार रात्री 

शेची पहाट पेरतो मी 


लढाई प्रत्येकाची 

जरी भिन्न ही येथे 

तरी धैर्य नी हिम्मत

अचाट पेरतो मी 


स्वार्थी जगात माझी

किंमत ही ठरलेली 

तरी मनात कायम  

विश्वास पेरतो मी


ज्यांसाठी धडधडते 

त्यांनी सोडली कास

तरीही हृदयी थोडे

मुक्त श्वास पेरतो मी 


#भारत (हिमांशू टेंभेकर)